आनंदात जगता आलं पाहिजे

आनंदात जगता आलं पाहिजे
आनंदात जगता आलं पाहिजे

आनंदात जगता आलं पाहिजे

आनंदात जगता आलं पाहिजे
लेखन:- संजय धनगव्हाळ
           (अर्थात कुसुमाई)
            एकदा वाचून बघा

जन्म आणि मृत्यू हे आयुष्याच्या दोन बाजू आहेत.जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचं मरण हे निश्चित आहे.मग कुणाला कसे मरण येते हे वेळ काळ ठरवतं पण जन्म आणि मृत्यू या दोघांमध्ये जे जगणं आहे ते जगणं माणसाला जगण्याची भाषा शिकवते माणसांच्या स्वभावाची ओळख करून देत असते.अनुभवातून माणूस शिकतो व अनुभव आल्याशिवाय माणूस कळत नाही.आणि जेव्हा माणसं कळायला लागलीत तेव्हा माणसाने माणसाशी माणसासारख वागलं पाहिजे.आपण बघतो आपल्या अवतीभोवती आपल्या परिसरातील आपल्या कुटुंबात आपल्या नातेवाईकांमध्ये वेगवेगळ्या स्वभावाची माणसे असतात.

काही कर्तृत्ववान असतात,काही निष्ठावान असतात,काही धृर्त मतलबी असतात काही मनमौजी असतात तर काही चिंताग्रस्त असतात.वेगवेगळ्या छटा वेगवेगळ्या भाव मुद्रा त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात.पण प्रसंन्नता चेहऱ्यावर दिसत नाही सतत नैराश्य निरसता त्यांच्यात ठासून भरलेली असते,उत्साह कधीचं दिसत नसतो.अशा जगण्या काय अर्थ ?आयुष्य क्षणभंगुर असते असं म्हणतात ते अगदी खरं आहे कारण  कोणत्यावेळी माणसाचं काय होईल काही सांगता येत नाही.चालता बोलत माणसं मरायला लागली वैद्यकीयक्षेत्रात प्रचंड प्रगती झाल्यावरही माणसाचं जगणं बे भरवशाच झालंय.

तेव्हा माणूस आज आहे उद्या काय होईल काहीच सांगता येत नाही. म्हणून माणसाने आनंदीत राहिलं पाहिजे,आनंदात जगल पाहीजे आनंद शोधला पाहिजे.आज परिस्थिती अशी आहे की अब्जाधीशही जगतो आणि गरीब ही जगतो पण दोघांच्याही जगण्यात वागण्यात राहण्यात बरीच तफावत असते प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगवेगळी असते.तसेच निसर्गाने कुस बदलली असल्यामुळे माणसांच्या आयुष्याची दोरी कमकुवत झाली आहे.कारण विचार बदलले,वागणे बदलले माणसिकता बदलेली बघण्याचा दृष्टीकोन बदलला.आपण बघतो रोज काहींना काही घटना घडत असतात घातपात,अत्याचार,हत्याचार हाणामारी, छेडछाडाच्या घटना तर चालता बोलता होतात.तेव्हा दैनंदिन जीवनातील धावपळीच्या गर्दीत आणि मोबाईल इन्स्टाग्राम फेसबुक इंटरनेटच्या जाळ्यात गुरफटलेली माणसं आनंद हरवून बसलीत.

आनंदात जगता आलं पाहिजे
आनंदात जगता आलं पाहिजे

इच्छा असून ही आनंद घेऊ शकत नाही.आंनदात राहता येत नाही किंवा आंनद घेत नाही.काही लोकांची तर विचारधारा किंवा मानसिकता अशी झाली आहे की पैसा हेच सर्व काही आहे पैशासाठी जगायचं पैशाच्या मागे धावायचं कमी वेळेत पैसा मिळवण्यासाठी काहीही करावं लागल तरी चालेल.अशी माणसं नकळत  वेगळे  वळण घेतात.कारण श्रीमंतीत जे सुख आहे ते कशातच नाही असा समज आजच्या लोकांमधे रूजलेला दिसून येतो. मुबलक पैसा असेल‌ तर मनासारखे जगता येते ऐशोआरामात रहाता येते.पैशाने सुख मिळते समृद्धी पायाशी लोळण घालते अशी धारणा आजच्या पिढीने स्विकारली आहे.पुर्वी असं नव्हतं समृद्धी नव्हती पण सुख भरभरून होतं.पैसा नव्हता पण आनंद, समाधानाची रेलचेल होती.

दोन घास पोटाला कमी मिळायचे पण चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत असे.घरात सौख्य होते आंनद कसा आणि कशात मिळेल याचा विचार करायचे गरजवंतासाठी हजार हात पुढे व्हायचे.स्वतःच्या अडचणी दुर ठेवून समोरच्याला मोठ्या मनाने मदत करतेवेळी त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ देत नव्हते.कारण स्वतःच्या कर्तृत्वाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर बघायचे.आपण कर्तव्यदक्ष आहोत म्हणून आपल कर्तव्य करून दुसऱ्याला आनंद देण्याच काम करण्यात समाधान समजून घेण्याची मानसिकता त्याकाळातल्या लोकांमध्ये होती.आज आता तसं दिसून येत नाही.हल्ली जो तो फक्त आपलंच बघतो.पैसा हेच सर्वकाही आहे.अस समजून माणस नात्यागोत्यात अंतर ठेवायला लागलेत आणि तसंच दिसून येतय.आपल्यातल थोडस दुसऱ्याला देण्यात जो आनंद आहे ना तो कशातच नसतो.म्हणून आनंद देता आला पाहिजे,आनंद शोधला पाहिजे आनंद घेतला पाहिजे.

आपल्या अवतीभोवती पाहिले ना तर जिकडे बघावं तिकडेच आनंद दिसेल.फक्त तिथपर्यंत पोहचा आलं पाहिजे,जाता आलं पाहिजे गेलं, पाहिजे.एखाद्या गरजू गरजवंताला गरीबाला मदत करण्यातच आनंद आहे असं नाही.जे आपल्या अंतर्मनाला भावेल ज्यातून आपले समाधान होईल त्यात आनंद आहे. माणूस आनंदात राहिलाना तर त्याला कसल्याच औषधांची गरज नसते निरोगी निरामय आयुष्य जगण्यासाठी समाधान वृत्तीच गरजेची आहे.जे आहे जसं आहे तसं जगण्यातून निर्माण होणारा आनंद सुखाच्या हजार वाटा दाखवत असतो.मोकळ्या जागी एखादी झाड लावा,रोज खतपाणी घाला मग बघा कालांतराने त्या झाडाच्या सावलीचा आनंद किती गारवा देतो.आपण वाढवलेल्या वृक्षाला मान उंचावून बघण्यात जो आनंद मिळतो ना तो दुसरा कशातच नसतो.

मुळात आज आनंद हरवलाय किंबहुना हरवत चाललाय माणूस आनंदापासून दुर होतोय.म्हणून आनंद शोधला पाहिजे.काही न करता कुठलीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्यालाही समाधान वाटेल असं काम करण्यात जो आनंद असतो ना तो सात मजली इमारती इतकं उंच असतो.नाहीतर काय रोज सकाळी उठा धावपळ करून आपल्या कामावर जा.तिच तशीच रोजची जीवघेणी मरमर धावपळ.या  जगण्याच्या रहाटगाड्यात‌ बऱ्याच गोष्टींना सोडावं लागतं.म्हटल तर आनंदाचे क्षण डोळ्यासमोर असतांनाही त्या क्षणांचा आनंद घेता येत नाही स्वत:च्या मनासारखं जगता येत नाही.सकाळी उठल्या उठल्या प्रपंचाचा विचार डोक्यात घोळत असतो.

तेव्हा आनंद कसा मिळवायचा,आंनद कसा घ्यायचा, अडचणी कितीही असु देत त्यावर मात करत आपल्या कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढत काही माणसं आनंद शोधत असतात.अर्थात काही जण रस्त्यावर बेवारस अवस्थेत पडलेली वेडसर भिकारी अनाथांना आधार देऊन त्यांना आश्रमात घेऊन त्यांची देखभाल करतात सुखासुखी आणि चांगल आयुष्य जगण्यासाठी त्यांचा सांभाळ करतात.अशा निराधारांची झोळी आनंदाने भरून देतात.

कोणाच कुणाशी काहीही संबंध नसताना एखाद्या परक्या अनोळखी माणसाच पालन पोषण करणे म्हणजे आनंदाची डोही आनंद तरंग असंच म्हणावं ना!.एखाद्याला आंनद देणं न देणं किंवा एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे न  अणणे हे आपल्या हातात असतं ज्याचं कोणी नाही त्याला आपलं म्हणून स्विकारण्याची मानसिकता कोणामधे दिसून येत नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ.तेव्हढतरी सौजन्य असायलाच हवं.वृत्ती माणसाला चांगलं काम करण्यास प्रवृत्त करत असते.अंगात उत्साह संचारला की माणसाच मन आपसूकच चांगल काम करण्याच्या मार्गावर वळण घेतं.

काही माणसं निवृत्ती नंतर आनंदाच्या शोधात भटकंती करतात म्हटलं तर,ट्रेकिंगला जातात गडकिल्ले सर करतात माहीत नसलेल्या कधी न पाहिलेल्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन तेथील माहिती गोळा करून त्यावर संशोधन करतात.तो त्यांचा छंद असला तरी आपण काहीतरी वेगळ करतोय याचा आनंद त्यांना लपवता येत नाही. समाधानच तेज त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते.आंनद कशात नाही हो बागकाम करण्यात स्वयंपाक करण्यात लहान मुलांसोबत घोडा होऊन खेळण्यात.

नृत्य करण्यात तसेच जे आपण करून शकलो नाही जे करता आले नाही जे काही राहून गेले ते करण्यात जो आनंद आहे ना तो फारचं वेगळा असतो.तेव्हा आंनद शोधला तर मिळतो.म्हणून आंनद शोधला पाहिजे.जेव्हा तुम्ही तुम्हाला आवडेल ते काम करता तेव्हा त्यातून मिळणारा आनंद तणावातून मुक्त करत असतो किंवा एक आगळ्यावेगळ्या समाधानाची उर्जा अंगात संचारते.पैसा जगण्याचं साधन आहे त्यातून समाधान मिळू शकते पण आनंद नाही.रस्त्यावरच्या भिकाऱ्याला तुमच्या डब्यातला एक घास खाऊ घाला बरं, तुमच्या अंगावरचा शर्ट त्याच्या अंगात घालून तर बघा.

फक्त कल्पनेतून एव्हढा आनंद मिळत असेल तर प्रत्येक्षात कृती केल्यावर किती हास्यानंद होईलं!आहो आनंद मिळवण्यासाठी खूप काही करता येईल पण ज्यांना आनंदाचं मर्म कळते अशीच माणसं आनंदाच्या डोहात डुबकी मारतात हे मात्र निश्चित.विचार सकारात्मक असेल तर नकळतपणे आनंदाने मन भरून येते.दुसऱ्याचा आनंदात बघताना जर आपल्याला आनंद वाटत असेल तर जरूर बघा.दुसऱ्याचा आनंद आपण स्विकारला म्हणजे आपल्या अवतीभोवती सहजपणे आनंदाच्या लहरी प्रदक्षिणा घालतील.दुसऱ्याच्या आंनदात सहभागी होण्याची आपली  मानसिकता असायला हवी किंवा दुसऱ्याचा आनंद स्विकारण्याची क्षमता आपल्यात असेल तर दुःखाच्या राशी आपल्या जवळ कधीच येणार नाही.थोडक्यात काय तर जळकुट्टेपणा जर सोडला ना तर जिकडे बघाल तिकडे आनंदच दिसेल.
आणि तुम्ही आयुष्याचा जास्त आनंद घेऊ शकाल.

आनंद ही मनाची अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे. दु:ख हा जीवनाचा एक भाग आहे.तेव्हा आनंदाची चांगली सवय तुम्हाला तुमच्या दु:खावर मात करून सकारात्मकतेने पुढे जाण्यास मदत करू शकते. जीवनात अनेक कारणे असू शकतात ज्याचा सामना करणे कठीण आहे.पण जो व्यक्ती दैनंदिन जीवनात आनंद देवू शकतो आनंदात राहू शकतो किंवा आनंद मिळवू शकतो तो व्यक्ती या परिस्थितींवर सहजतेने मात करू शकतो.माणसाने जर भूतकाळाचा जास्त विचार न करता किंवा भविष्याची जास्त चिंता न करता वर्तमान क्षणांचा आनंद घेतला तर आयुष्यात आनंदाची कमतरता कधीच भासत नाही.

काहींच्या वाटेला ईतकं वैभव असतं पण ज्या पध्दतीने जंगल पाहिजे तसं जगत नाही किंबहुना जगता येत नाही.काहींजवळ काहीच नसतं पण रोज येणाऱ्या नवनवीन अनुभवात नविन सुख शोधतात.त्या सुखाचा आनंद घेतात.काही सर्वसामान्य असतात पण जगणं मात्र निरस कृष कोरड असतं.गोड गुलाबी आयुष्यात आनंदाच्या ओलाव्याची हिरवळ जर हवी असेल तर सुखाचा गारवाही तितकाच महत्त्वाचा असतो.एक आगळ्यावेगळ्या अनुभवातून निमार्ण होणारं सुख माणसाला भरभरून आनंद देतो.म्हणून आनंद शोधला पाहिजे. नुसतच जबरदस्तीने जगण्याला जगणं म्हणत नाही.

टवटवीत दिसणाऱ्या रोपट्याला काही दिवस पाणी नाही टाकले तर ते मृतावस्थेत येते.पण पुन्हा पाणी टाकायला सुरुवात केली तर ते पुन्हा टवटवीत दिसायला लागते.माणसाच आयुष्यही तसच असत.संपुर्ण आयुष्य कष्टात जाते नाविण्य काहीच नसतं म्हणून नाविण्यातून नाविण्यपूर्ण  जगण्यासाठी नव्या अनुभवातून आनंद मिळवला पाहिजे.जगा हो सगळ्या अनुभवातून जा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आत्मसुख मिळवण्याचा प्रयत्न करा.माणसाच आयुष्य केव्हा कधी संपेल काही सांगता येत नाही.चलताबोलता केंव्हाही माणसं मरायला लागली. तेव्हा आयुष्यात जे जे करता येईल ते सर्व करा काही राहून गेलं असं वाटलं नाही पाहिजे.

आयुष्यात चैतन्यासाठी आनंद असला पाहिजे चरमसूखाच्या शिखरावर विराजमान होण्यासाठी माणसांच्या आयुष्यात आनंदाचे तरंग असल्याशिवाय माणसाचे जीवन पूर्णतृप्त होत नाही. सांगायच तात्पर्य असे की माझ्याकडे काहीच नाही असं गृहीत धरून माणसं रडत बसतात आणि आनंदाला दुर ठेवतात.पण खरं सांगायचं झालं तर आपल्याकडे बरंच काही असतं पण आपणं शोधत नाही.निसर्गाने या सृष्टीत एव्हढ भरभरून दिलंय की ते सरता सरनार नाही.फक्त दृष्टी सकारात्मक असायला हवी मग बघा आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडेच दिसेल काय!.

संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमाई)
९४२२८९२६१८
९५७९११३५४७