पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर Ahilyabai Holkar Jayanti
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (1725-1795) एक प्रसिद्ध मराठा शासिका आणि सामाजिक सुधारक होत्या. त्यांनी 1767 ते 1795 पर्यंत मालवा प्रांतात राज्य केले. त्या न्यायप्रिय, धार्मिक आणि सामाजिक भलाईसाठी प्रसिद्ध होत्या.
अहिल्याबाई होळकर यांचे जीवन:
जन्म:
31 मे 1725 रोजी, महाराष्ट्र, अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे.
विवाह:
8 वर्षाच्या वयात खंडेराव होळकर यांच्याशी विवाह झाला.
राज्याभिषेक:
1767 मध्ये, पति मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर, त्यांनी मालवा प्रांताची राज्यव्यवस्था सांभाळली.
राज्याभिषेक:
त्यांनी 28 वर्षे राज्य केले.

मृत्यू:
13 ऑगस्ट 1795 रोजी, त्यांचे निधन झाले.
अहिल्याबाई होळकर यांचे कार्य:
राजकीय कार्य:
त्यांनी मराठा साम्राज्याची सत्ता मजबूत केली.
त्यांनी इंग्रजांशी लढण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सामाजिक कार्य:
त्यांनी अनेक मंदिर, मठ आणि सार्वजनिक बांधकामं बांधली.
त्यांनी समाजातील गरीब आणि गरजू लोकांसाठी अनेक योजना सुरू केल्या.
त्यांनी महिला शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
न्यायप्रियता:
त्यांना न्यायप्रिय आणि धर्मनिष्ठ शासिका म्हणून ओळखले जाते.
त्यांनी नेहमी गरीब आणि गरजू लोकांसाठी न्याय दिला.
अहिल्याबाई होळकर यांचे महत्त्व:
त्यांच्या कार्यामुळे मराठा साम्राज्य आणि सामाजिक सुधारणांना चालना मिळाली.
त्यांना एक आदर्श शासिका, सामाजिक सुधारक आणि न्यायप्रिय व्यक्ती म्हणून ओळखले जाते.
त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही अनेक ठिकाणी दिसतो.

मराठा सम्राज्य मंदिरा वरील
सोन्याचा कळस
म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी!
देवी, महादेवी, भगवती, गंगाजल निर्मळ मातोश्री, लोकमता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. यांची आज 300 वी जयंती आहे. त्या निमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!
पुण्यश्लोक म्हणजे पुण्याचा साठा. जिच्या पदरी पुण्याचा खूप मोठा संचय आहे, अशी महादेवी भगवती म्हणजे लोकमाता अहिल्यादेवी होळकर. कलियुगातील त्या एकमेव पुण्यश्लोक आहेत. त्रेता युगात बिभीषण हे पुण्यश्लोक होते. द्वापार युगात नळराजा आणि पांडव श्रेष्ठ धर्मराज युधिष्ठिर हे पुण्यश्लोक होते. आणि कलियुगात मातोश्री अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक आहेत.
त्यांनी धर्मासाठी केलेले काम एवढे प्रचंड आहे कीं, कलियुगात पुण्यश्लोक पदापर्यंत पोहचणाऱ्या त्या एकमेव देवी आहेत.
काशीच्या सर्व पंडित, शास्त्री, आचार्य, प्राचार्य, धर्माधिकाऱ्यांनी मातोश्रीना एकमुखी पुण्यश्लोक पदवी बहाल केली आहे.
अहिल्यादेवी यांचं काम खूप मोठं आहे. जनतेला अन्न, वस्त्र, निवारा यांच्या सहित मुबलक पाणी उपलब्ध करून दिल. रोजगार दिला, संरक्षण दिलं, न्याय दिला. प्रत्येकाला त्याच्या कुवती प्रमाणे आणि कौसल्या नुसार संधी उपलब्ध करून दिली. राजाची जनते प्रती जीं कर्तव्य आहेत ती सर्व उच्चं कोटीची पार पाडली. त्याच बरोबर यां देशाची संस्कृती, देव, धर्म, यांना सुद्धा अहिल्यादेवीने संरक्षण दिलं.
महमद-बिन-कासीम हा यां देशावरील पहिला क्रूर आक्रमक हल्लेखोर होता. त्याने सिंधचा राजा दाहीर याची हत्या करून त्याच्या घरातील स्त्रिया, संपत्ती लुटून नेल्या. त्या खलिपाला नजर केल्या. हीं घटना ई स 710 ची आहे. तिथून पुढे हा क्रूर खेळ आक्रमक खेळत राहिले. तो थेट मोगल आक्रमक औरंगजेब पर्यंत म्हणजे ई स 1700 पर्यंत म्हणजे एक हजार वर्ष सुरु होता. एकूण एक हजार वर्ष हा नंगा नाच सुरु होता. त्यांत, खिलाजी, तुघलक, तुर्क, अफगान, अरब अशा भयंकर राक्षशी लाटा आदळत राहिल्या. महमद गझनवी, महमद घोरी, नादीर शहा, तैमूर लंग, शाह अब्दाली अशा क्रूर कसायानी भारतीय जन जीवन, संस्कृती, संपत्ती, प्राण, अब्रू यांची अघोरीं लूट सुरु केली होती. यां आक्रमकानी देशातील सर्व मंदिर उध्वस्त केली. मुर्त्या फोडल्या. काही मंदिराचं मसिदीत रूपांतर केल तर काही मंदिर भग्न अवस्थेत सोडून दिली. याला सर्वात आधी पायबंद छत्रपती शिवाजी महाराज यांनी घातला.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलशहा, निझामशहा, कुतुबशहा, आदिलशहा, सिद्धी जोहार यां सर्वांच्या छताडावर पाय ठेवून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतःच रक्त शिंपडून तें प्रखर केले. आणि श्रीमंत बाजीराव पेशंवे यांनी सुभेदार मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, पवार, भोसले, गायकवाड यां सरदारांना सोबत घेऊन भारतभर मराठा साम्राज्य उभे केले. दुष्ट आक्रमक ऱाक्षसांच्या मगर मिठीतुन भारत मुक्त केला.
यां भारतातील सर्व उध्वस्त मंदिर अहिल्यादेवीनी बांधून काढली. अशी सहा हजार मंदिर उभी केली ज्यात काशिविश्वनाथ सह सर्व 12 ज्योतिर्लिंग आहे. त्या सोबत धर्मशाळा, घाट, बंधारे, रस्ते, बांधले. अन्नछत्रे उभारली. दरोडेखोरांचा बंदोबस्त करून त्यांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून दिली. म्हणून ती पुण्यश्लोक आहे.
स्वातंत्र्या नंतर 77 वर्ष उपेक्षित राहिलेले छत्रपती शिवाजी महाराज यांना आताशी भारतीय नौदलाचे जनक म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांची अष्टकोनी राजमुद्रा नौदालाच्या ध्वजावर घेण्यात आली.
तसाच सन्मान अहिल्यादेवी यांचा करण्यात येत आहे. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवीनच नांव देण्यात आले. अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्यात आले. काशी विश्वनाथाच्या मंदिरात अहिल्यादेवींचा पूर्ण आकृती पुतळा उभारण्यात आला. यांपुर्वी 1995 साली अहिल्यादेवी यांच्या 200 व्या पुण्यतिथीचे निमित्त साधून स्व गोपीनाथ मुंडे यांच्या कल्पनेतून आणि प्रयत्नातून चौडी गावचा विकास करण्यात आला.
आज चौडी येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात भव्य कार्यक्रम पार पडला.
तिकडे मध्यप्रदेश जे अहिल्यादेवीनच राज्य आहे तिथे स्वतः पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी याच्या उपस्थितीtc मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भोपाळ येथे भव्य जयंती कार्यक्रम घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होळकर राजधानी इंदूर शहरांत मेट्रोचे उदघाटन केल. अहिल्यादेवी यांचं चित्र असलेलं पोस्टाच तिकीट आणि 300 रुपयाच नाण प्रकाशित केल. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्यात अहिल्यादेवी यांच्या नावे महिला सबली करण योजना सुरु केली. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात गावोगावी जयंतीचे कार्यक्रम रथयात्रा निघत आहेत.
त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
बापू हटकर